Maharashtra Political News LIVE : तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात
तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात. देशभरात तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर होणार मतदान. 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि समान नागरी कायदा यांची अंमलबजावणी होऊ देणार नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण. काही लोक निवडणुकीदरम्यान ‘दंगली घडवून आणण्याचा’ प्रयत्न करतील असा दावा करताना, लोकांनी त्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये अस आवाहन ममता बनार्जी यांनी केलंय. उत्तर पुण्यातील शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील गहूं काढणीला वेग आलाय. सादलगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब जाधव यांच्या पाच एकरावरील गहूं काढणीची लगबग सुरू असल्याचं दिसून आलं. सध्या शेत मजुरांची कमतरता असल्याने शेतकरी राजाने यंत्राच्या साहाय्याने गहूं काढणीला सुरुवात केली आहे. शिरूर कृषी विभागाच्या मदतीने यंदाचं गव्हाचं विक्रमी पिकं आल्याने शेतकरी राजा मालामाल होणार. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List