सर्वाधिक आनंद कधी झाला…शरद पवार यांनी सांगितली ती गोष्ट

सर्वाधिक आनंद कधी झाला…शरद पवार यांनी सांगितली ती गोष्ट

शरद पवार यांनी सोमवारी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील उंडवडी पठार या गावातून केली. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका करताना आपले अनुभव सांगितले. आपणास सर्वात जास्त आनंद कधी झाला? हे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 10 वर्षे देशाचा कृषिमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपणास सर्वात जास्त आनंद झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मनमोहनसिंग यांच्याकडे काय मागितले?

शरद पवार म्हणाले की, माझ्या कामाची सुरुवात जिरायत भागापासून झाली. जिरायत भाग आणि दुष्काळाचे नाते कायमचे होते. त्यामुळे गावोगावी रोजगार हमी कामे आणि बंधारे बांधण्यास सुरवात केली. राजकारणात असताना अनेक मंत्रीपदे भूषवली. पण सर्वाधिक आनंद देशाचे कृषीमंत्री झाल्यावर झाला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोणते मंत्रीपद हवे? अशी विचारणा केली होती. त्यावेळी इतर कोणतेही पद न मागता कृषीमंत्रीपद आपण मागितले.

कृषीमंत्रीपद मिळाल्यावर काय केले

देशाचा कृषीमंत्री शेतीत अनेक बदल केले. त्यामुळे आज जगात 18 देशांमध्ये धान्य निर्यात होत आहे. शेतकऱ्यामुळे ही बाब घडून आली. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. भाजपा हा मग्रूर पक्ष आहे. दिल्लीत तीनदा मुख्यमंत्री भूषविले अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. महाराष्ट्र राहुल गांधी की नरेंद्र मोदी यावर निवडणूक प्रचार होत आहे. परंतु ही लढाई स्थानिक प्रश्नावर आहे. ही लढाई घरगुती झालीय.

सुप्रिया सुळे यांचे केले कौतूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. जिरायत भागाने माझी कधीही साथ सोडली नाही. सुप्रिया सुळे ही माझी मुलगी आहे, हे या भागातील लोकांनी मान्य केले आहे. तिला संसदेत जोरदार कामगिरी केली आहे. देशातील पहिल्या तीन खासदारांमध्ये ती आहे. संसदेत तिची उपस्थिती ९० टक्के आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;