नंदुरबारच्या देवगोई घाटात स्कूल बस शंभर फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थी ठार, 38 जखमी

नंदुरबारच्या देवगोई घाटात स्कूल बस शंभर फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थी ठार, 38 जखमी

नंदुरबार जिह्यातील देवगोई घाटात रविवारी शंभर फूट खोल दरीत स्कूल बस कोसळून भीषण अपघात झाला. यात दोन विद्यार्थी ठार झाले, तर 38 विद्यार्थी जखमी आहेत. नंदुरबार व अक्कलकुवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील आश्रमशाळेची ही बस आहे.

नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि मोलगी येथील मुले जळगाव जिह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेतात. दिवाळीची सुट्टी संपल्याने ते रविवारी बसने आश्रमशाळेत जात होते. दुपारी चारच्या सुमारास देवगोई घाटात अमलबारी येथे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस शंभर फूट दरीत कोसळली. या अपघातात जगदीश बहादुरसिंग तडवी हा तेरा वर्षीय मुलगा ठार झाला, तो अक्कलकुवाच्या काठी येथील रहिवाशी आहे. काठीचा राऊतपाडा येथील कपिला जहांगीर राऊत (14) ही मुलगीही मृत्यू पावली. बारा ते चौदा वयोगटातील 20 मुली व 18 मुले असे एकूण 38 विद्यार्थी जखमी असून, त्यांच्यावर नंदुरबार आणि अक्कलकुवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अजित पवार गटाच्या सहकार मंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, पणन विभागाचे अपील भाजपचे मंत्री रावल चालवणार अजित पवार गटाच्या सहकार मंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, पणन विभागाचे अपील भाजपचे मंत्री रावल चालवणार
राज्यातील सहकार मंत्र्यांना अपील प्रकरणात असलेले वैधानिक अधिकार कमी करून यापुढे पणन विभागाशी संबंधित सर्व अपील पालक मंत्र्यांकडे चालणार आहेत....
शिरुरकरांनी लढविली शक्कल, बिबट्यांपासून संरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा!
महत्त्वाच्या बातम्या – सुमेध वडावाला लिखित ‘कार्यकर्ता’ला पुरस्कार 
सिंहस्थ कुंंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे स्वतंत्र मार्गिका
न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे मणिपूरला गेलो होतो, तिथल्या  वृद्ध महिलेच्या डोळय़ांत अश्रू होते! सरन्यायाधीशांनी भीषण परिस्थितीवर केले भाष्य
गुन्हे वृत्त – रेकी करून चोऱ्या करणाऱ्या टोळीला अटक
त्वचेपासून जीभ तयार करून कॅन्सरग्रस्ताला नवसंजीवनी, नामको रुग्णालयातील घटना