न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे मणिपूरला गेलो होतो, तिथल्या  वृद्ध महिलेच्या डोळय़ांत अश्रू होते! सरन्यायाधीशांनी भीषण परिस्थितीवर केले भाष्य

न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे  मणिपूरला गेलो होतो, तिथल्या   वृद्ध महिलेच्या डोळय़ांत अश्रू होते!  सरन्यायाधीशांनी भीषण परिस्थितीवर केले भाष्य

मणिपूरमध्ये महिलांची सुरक्षा चिंतेचा विषय असतानाच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तेथील भीषण परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. मी मणिपूरला गेलो होतो तेव्हा मला भेटण्यासाठी वृद्ध महिला पुढे आली. तिच्या डोळय़ांत अश्रू होते, ती हात जोडून मला म्हणाली, दादा, असाच राहा. त्या महिलेचे वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले, अशा शब्दांत गवई यांनी मणिपूर भेटीची आठवण सांगितली. न्यायाचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात कायदेशीर मदतीसंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश गवई बोलत होते. कायदेशीर सेवा एक चळवळ असून त्याचे परिणाम आकडेवारी किंवा वार्षिक अहवालांमध्ये नाही, तर दुर्लक्षित नागरिकांच्या आत्मविश्वास आणि कृतज्ञतेमध्ये दिसून येतात, असे सांगतानाच सरन्यायाधीशांनी मणिपूरच्या भेटीचा उल्लेख केला.

काही महिन्यांपूर्वीच मी एनएएलएसएचा कार्यकारी अध्यक्ष असताना माझ्या सहकाऱयांसह मणिपूरला गेलो होतो. तेथे चुराचंदपूर येथील एका शिबिरात विस्थापितांना साहित्य वाटप करण्यास गेलो. तिथे एक वृद्ध महिला पुढे आली. तिच्या डोळय़ांत अश्रू होते, ती हात जोडून मला म्हणाली, दादा, असाच राहा. ते वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. आपल्या यशाचे खरे मोजमाप आकडय़ांमध्ये नव्हे, तर सामान्य माणसाच्या विश्वासात आहे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.

न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही!

न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही. न्याय प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे न्यायाधीश व वकिलांचे कर्तव्य आहे. कायदेशीर चळवळीचे खरे प्रतिफळ आकडेवारी किंवा वार्षिक अहवालांमध्ये नाही, तर दुर्लक्षित नागरिकांची कृतज्ञता आणि त्यांच्या आत्मविश्वासात आहे, असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध  खा आणि काय बदल होतोय ते पाहा… मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…
हिवाळ्यात तापमान कमी होते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यासाठी थंडीचा काळ खूप आव्हानात्मक...
महसूलमंत्री असताना मुंढवा जमीन प्रकरणाची फाईल मी नाकारली होती, बाळासाहेब थोरात यांचा गौप्यस्फोट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशहून 9700 बॅलेट, 4877 कंट्रोल युनिट दाखल
मोठी बातमी – डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, एके-47 आणि जिवंत काडतूस जप्त; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
ठाणे महापालिकेत नवीन कॅफो, जुना कॅफो; नवे वित्त अधिकारी येऊनही सह्या मात्र जुन्याच अधिकाऱ्याच्या
तारापूरमध्ये पाच वर्षांत 48 कामगारांचा बळी; 90 जण जायबंदी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
झोपेतच काळाचा घाला; घराचं छत कोसळून अख्खं कुटुंब ठार, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश