मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, सविस्तर प्रकल्प अहवालासाठी प्रक्रिया सुरू

दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या मुंबईकरांची नजिकच्या भविष्यात वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. शहरात भूमिगत रस्त्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रस्तावित उपक्रमांतर्गत मुंबई कोस्टल रोड, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील बुलेट ट्रेन स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-2) यांना जोडणारा भूमिगत कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भूमिगत मार्गामुळे वाहतुकीवरील दाब कमी होईल. अवजड वाहनांची हालचाल भुयारी रस्त्याद्वारे वळवण्यात येणार असल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. सुमारे 70 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे. या माध्यमातून रस्ते आणि मेट्रो यांना पूरक एकत्रित वाहतूक नेटवर्क तयार केले जाणार असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध  खा आणि काय बदल होतोय ते पाहा… मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…
हिवाळ्यात तापमान कमी होते, ज्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ज्यांना आधीच काही आजार आहेत त्यांच्यासाठी थंडीचा काळ खूप आव्हानात्मक...
महसूलमंत्री असताना मुंढवा जमीन प्रकरणाची फाईल मी नाकारली होती, बाळासाहेब थोरात यांचा गौप्यस्फोट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशहून 9700 बॅलेट, 4877 कंट्रोल युनिट दाखल
मोठी बातमी – डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, एके-47 आणि जिवंत काडतूस जप्त; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
ठाणे महापालिकेत नवीन कॅफो, जुना कॅफो; नवे वित्त अधिकारी येऊनही सह्या मात्र जुन्याच अधिकाऱ्याच्या
तारापूरमध्ये पाच वर्षांत 48 कामगारांचा बळी; 90 जण जायबंदी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
झोपेतच काळाचा घाला; घराचं छत कोसळून अख्खं कुटुंब ठार, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश