राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक

राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक

हरयाणातील मतचोरीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या सादरीकरणाचे शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काwतुक केले. ’हे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने पाहण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

‘भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोग कसा मदत करतो आहे हे राहुल गांधी यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. आपल्या देशात निवडणुका कशा चोरल्या जात आहेत हे जग बघत आहे. हा विषय राजकारण किंवा विचारधारेशी संबंधित नाही. हा विषय केवळ एका पक्षाला मतचोरीसाठी मोकळे रान देऊन नागरिकांच्या मतांचे मूल्य शून्य करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोणी राहुल गांधी, काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी सहमत असेल किंवा नसेल, पण मतचोरीवर त्यांनी जे मांडले ते पाहण्यासारखे आहे. ही लढाई मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी आहे. ही लढाई लोकशाही आणि संविधानासाठी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयोगामुळे लोकशाहीची प्रतिमा मलिन

‘काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने वरळी आणि महाराष्ट्रातील काही इतर मतदारसंघांतील मतदारांची फसवणूक उघडकीस आणली. त्या विरोधात मोर्चाही काढला. परंतु निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास नकार दिला. मागच्या काही वर्षांत निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीची प्रतिमा खराब केली आहे. पक्षपाती निवडणुका घेणारी फ्रॉड लोकशाही अशी ओळख आपल्या लोकशाहीची झाली आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास ‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास
संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या...
पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने बडतर्फ, महिला डॉक्टर आत्महत्या
वेळापुरात सापडले छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प
महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी
राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक
उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल