राज्यातील हजारो बेरोजगारांचा नाशिकमध्ये प्रतीकात्मक कुंभमेळा; श्रीरामकुंडात केले स्नान, महायुतीने फसवले… आमची या साडेसातीतून सुटका करा!

राज्यातील हजारो बेरोजगारांचा नाशिकमध्ये प्रतीकात्मक कुंभमेळा; श्रीरामकुंडात केले स्नान, महायुतीने फसवले… आमची या साडेसातीतून सुटका करा!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेऊनही कामच मिळत नसल्याने राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थींनी सरकारविरोधात आज नाशिकमध्ये धडक दिली. प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांनी श्रीरामकुंडात स्नान करून आंदोलन छेडले. देवा मामा, एकनाथ मामा, अजित मामा कुठे आहेत, अशा घोषणा देत आमची साडेसातीतून सुटका करा, महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा, असे साकडे त्यांनी गोदामातेला घातले. हा आमचा प्रतीकात्मक कुंभमेळा असून, यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आमरण उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील तरुण-तरुणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ) योजनेतून मानधन आणि रोजगार देण्याची घोषणा केली. हे प्रशिक्षण घेऊनही आज राज्यातील 1 लाख 34 हजार तरुणांना कायमस्वरूपी काम मिळालेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने वाऱयावर सोडले. सरकारच्या पत्राचा उपयोग होत नाही, यामुळे हजारो तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सरकारने शब्द पाळला नसल्याने हक्काच्या भाकरीसाठी तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिंदेंविरोधात ठाण्यात, मुंबई आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर आज ह.भ.प. तुकाराम महाराज आणि बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या अन्यायग्रस्त प्रशिक्षणार्थींनी नाशिक गाठले. आज पाच हजार आंदोलक नाशिकला दाखल झाले. त्यांनी दुपारी सीबीएसजवळील शिवतीर्थावर ठिय्या मांडला. लाडके मामा एकनाथ मामा, देवेंद्र मामा, अजित मामा यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

गोदामातेनेच आम्हाला न्याय द्यावा, कायमस्वरूपी रोजगार मिळावा, म्हणून नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याआधी प्रतिकात्मक कुंभमेळा भरवत आहोत, असे तुकाराम महाराज यांनी सांगितले. पोलिसांच्या विनंतीमुळे सर्वच युवक गोदाकाठावर दाखल झाले नाहीत. प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही स्नान करून गोदामातेकडे व्यथा मांडल्या आहेत, असे ते म्हणाले.

लाडक्या मामांविरोधात आमरण उपोषण

अकरा महिने काम केल्यानंतर पुढे काय करायचं, याचं आम्हाला सरकारने उत्तर दिलेलं नाही. हक्काच्या भाकरीसाठी आमचे हे गोदाकाठी आमरण उपोषण असणार आहे. आज पाच हजार बेरोजगार तरुण नाशिकला आले आहेत, उद्या पंचवीस हजार येतील, असे बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास ‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास
संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या...
पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने बडतर्फ, महिला डॉक्टर आत्महत्या
वेळापुरात सापडले छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प
महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी
राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक
उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल