माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती

माभळे गावात सलग पाचवी पिढी राबवत आहे सामूहिक शेतीचा अनोखा प्रयोग, 20 कुटुंबातील 70 माणसे करत आहेत एकत्र शेती

कोकणातील भात शेती क्षेत्र छोट्या तुकड्यांमध्ये विभागले गेली आहे. अनियमित पडणारा पाऊस आणि शेतीसाठी वाढत्या खर्चामुळे शेतीक्षेत्र कमी होत आहे. कमी होणारे मनष्यबळ यामुळेही शेती परवडेनाशी झाली आहे. असे असताना पारंपारिक शेती जतन व्हावी आणि घरातील सर्व कुटूंबियांमध्ये एकोपा राहावा यासाठी माभळे जाधववाडीतील २० कुटूंबे एकत्र येवून सलग पाचवी पिढी सामूहिक शेतीचा पॅटर्न राबवत आहे.

अनियमित पावसाचा कोकणातील भात शेतीला मोठा फटका बसतो. कोकणातील शेती क्षेत्र विभागले गेले आहे. कुटूंब विभक्त झाल्याने जमिनीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी झाल्याने अनेकांनी शेती सोडली आहे. त्यामुळे भात शेतीचे क्षेत्र कमी होवू लागले आहे.

मात्र माभळे जाधववाडीतील २० कुटूंबियांनी आपली पारंपारिक शेती जतन केली आहे. दरवर्षी शेती करण्यासाठी 20 कुटूंबातील ७० माणसे एकत्र येवून मेहनत घेतात. कवल तोडणीपासून शेतीच्या सर्व कामांमध्ये घरातील लहान मोठ्यांचा हातभार लागतो. जाधव कुटूंबियांची बोकडचा मळा येथे दोन एकर जमीन असून त्यामध्ये भात शेती करत आहेत. एकत्र कुटूंबियांची जवळपास २० एकर शेतीक्षेत्र आहे. शेतीतील हिश्यातून आजारी व्यक्तीवर उपचार सामुहिक शेती करत असताना ज्येष्ठ मंडळींना सर्वात मोठा मान दिला जातो. 20 कुटूंबातील कोणी आजारी पडले तर, या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनाचा हिस्सा देवून त्यांच्या खर्चाची तरतूद केली जाते. शिमगा झाल्यावर पालखी घरोघरी जाण्याच्या अगोदर या शेतीचा पहिला मान आहे. या ठिकाणी जावून नंतर पालखी घरोघरी जाते. आजही ही परंपरा सुरू आहे. त्याठिकाणी जाधव कुटूंबियांनी सहान तयार केलेली आहे.

याबाबत बोलताना जाधव कुटूंबियांतील जेष्ठ सदस्य वामन जाधव म्हणतात की, आजही सामूहिक शेतीची परंपरा सुरू असल्याचा आनंद होत असल्याचे सांगतात. शेती निमित्त आम्ही सर्व एकत्र येतो आणि शेती करतो . भात शेती दरम्यान जेवण, एकत्र विचार आणि मेहनत यांची देवाण घेवाण होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो? Alcohol Consumption : उपाशी पोटी दारू पिणे योग्य की अयोग्य? शरीरावर नेमका काय परिणाम होतो?
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहीकाही महाभाग तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारूची बॉटल तोंडाला लावतात. दारूच्या आहारी...
दिवाळीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने पोट बिघडलंय? तर तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ उपायांचा करा अवलंब काही क्षणातच मिळेल आराम
सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलाच्या पायावरून गेली गाडी, मुलगा गंभीर जखमी
चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकात तांत्रिक बिघाड; वाहतूक ठप्प
सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, जीविका दीदांना ३० हजार रुपयांचे वेतन; तेजस्वी यादव यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा
हवेचा AQI 400 च्या पुढे गेला तर मूड, मेंदूवर परिणाम होतो? जाणून घ्या
नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवर