‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल

‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल

येथील दूधगंगा–वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 2025–26 या गाळप हंगामासाठी प्रतिटन 3452 रुपयांप्रमाणे विनाकपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊसदर नाही, असेही त्यांनी सांगितले.

कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘बिद्री’ने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून शेतकऱयांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हंगाम समाप्तीनंतर सरकारच्या नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱयानुसार शेतकऱयांना अंतिम ऊसदर दिला जाईल. कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, सभासद यांचा विश्वास जपला आहे.

विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन 8 हजार 500 टन क्षमतेने ऊसगाळप करण्यास सज्ज आहे. कारखाना व्यवस्थापनाने ठरविलेले 10 लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ऊस उत्पादकांनी ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक