भरकटलेल्या सात बोटीपैकी एकही बंदरात परतली नाही, मच्छीमारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

भरकटलेल्या सात बोटीपैकी एकही बंदरात परतली नाही, मच्छीमारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या आणि वादळात भरकटलेल्या सातही मच्छीमार बोटी आज रात्री उशिरापर्यंत कोणत्याही बंदरात परतल्या नाहीत. त्यामुळे या बोटींवर असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बोटींवरील वायरलेस यंत्रणा फेल झाल्याने या बोटींचे लोकेशन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत.

कौसा-ठाणे येथील अब्दुल्ला खान यांच्या मालकीची श्री साई समर्थ कृपा बोटीवरील खलाशांशी संपर्क झालेला नाही. मात्र मालकाशी संपर्क झाला. आज संपर्क झाला असून या बोटीवर १८ खलाशी आहेत, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी सांगितले. न्हावा-पनवेल येथील चंद्राई व श्री गावदेवी मरीन या दोन्ही बोटी पालघर किनाऱ्यापासून १२४ किमी सागरी अंतरावर बुधवारी दिसून आल्या होत्या. मात्र परतीच्या मार्गावर असलेल्या या दोन्ही बोटींच्या हालचाली गुरुवारी दिवसभरात दिसून आलेल्या नाहीत. मत्स्यव्यवसाय विभाग व अन्य त्रयस्थांकडूनच दोन्ही बोटी खलाशांसह सुरक्षित असल्याचे श्री गावदेवी मरीन मच्छीमार बोटीचे मालक सत्यवान पाटील यांनी सांगितले.

शोधमोहीम सुरू

मोंथा वादळामुळे मुंबई बंदरातील भरकटलेल्या या सातही मच्छीमार बोटी गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही बंदरात परतल्या नाहीत. त्यामुळे खराब हवामान व वादळी वाऱ्यामुळे भरकटलेल्या सातही मच्छीमार बोटी समुद्रातच सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवण्यात आल्या असल्याची शक्यता मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केली आहे. या बोटींची शोधमोहीम सुरू आहे, असे तटरक्षक दलाचे कमांडंट रवी वेणूगोपाल यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक