महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विनयभंगाच्या प्रकरणात बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. महिलेला पाहून शिट्टी वाजवणे, महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. एप्रिल 2013 मध्ये कांदिवली चारकोप परिसरात ही घटना घडली होती. तब्बल बारा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.

कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील भगवती हॉस्पिटलसमोरील फूटपाथसमोर ही घटना घडली होती. आशा पाटील (नाव बदललेले) ही महिला 2013 पासून पाणीपुरीची हातगाडी चालवत होती. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या महिलेने तिला व्यवसाय सुरू करण्यास मदत केली होती. 22 एप्रिल 2013 रोजी आशा हिने तिची हातगाडी एका ठिकाणी उभी करुन ठेवली होती. त्यादरम्यान आरोपी प्रशांत अरविंद गायकवाडने त्याच्या बहिणीला सोबत घेऊन हातगाडीचे नुकसान केले होते.

याबाबत आशा हिला माहिती मिळताच ती घटनास्थळी धावत गेली आणि तिने आरोपीला हातगाडीचे नुकसान केल्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला. त्यादरम्यान आरोपीने आशा हिच्याशी भांडण सुरू केले. तसेच तिची ओढणी ओढून विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सरकारी पक्ष आरोपीविरोधातील विनयभंगाचा गुन्हा सिद्ध करण्यास यशस्वी झाला आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने आरोपी प्रशांत गायकवाड याला विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास व 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक