राजस्थानमध्ये एटीएस आणि आयबीची मोठी कारवाई, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

राजस्थानमध्ये एटीएस आणि आयबीची मोठी कारवाई, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांनी इसीसीच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर आता राजस्थानमधील जोधपूर आणि जैसलमेर येथे एटीएस आणि आयबीने छापेमारी केली आहे. एटीएस आणि आयबीने केलेल्या संयुक्त कारवाईत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना जोधपूर, तर एकाला जैसलमेर येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवल्याचा आणि फंडिंग नेटवर्क उभारल्याचा आरोप आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएस आणि आयबीने शुक्रवारी राजस्थानमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. दहशतवादी कारवायासंबंधी ही छापेमारी करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही आपत्तीजनक सामग्रही जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे याआधी दिल्लीतही पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई करत अदनान खान याच्यासह अन्य काही जणांना अटक केली होती. त्यानंतर राजस्थानमध्येही अशीच कारवाई झाल्याने सुरक्षा दलाला मोठा दहशतवादी कट उधळण्यात यश आले आहे.

ISIS module busted in Delhi – दिल्लीत बॉम्बस्फोटाचा मोठा कट उधळला; ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक