Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी

Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी

2015 पासून सर्व शेतकरी आणि मच्छिमार यांची सर्व कर्ज माफ करा अशी मागणी आज रत्नागिरी जिल्हा जिल्हा शेतकरी, आंबा-काजू उत्पादक आणि मच्छिमार संघटनांनी केली. अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि वादळांमुळे मच्छिमारांचे नुकसान झाले असल्याचे मत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडण्यात आले. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या लढ्याला पाठिंबा देताना आज आंबा बागायतदार आणि मच्छिमार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

निवेदनात त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही पीक विम्याची रक्कम विमा कंपनीला न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. फळबागांना ई-पीक पाहणी रद्द करावी, वन्य प्राण्यापासून पीकांचे नुकसान होते त्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश साळवी, दीपक उपळेकर, बी.के. पालकर, श्रीकृष्ण कबीर, अनिल शेलार, संजय कदम, अशोक भाटकर, अमृत पोकडे, हरिश्चंद्र गोरीवले उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक