ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

कार चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबलं गेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक्सलेटर दाबलं गेल्याने कार अनियंत्रित झाली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळमधील वणी घुग्गुस मार्गावर ही घटना घडली. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

वणी येथील लालपुलिया परिसरात राहणारे रियाज शेख हे गॅरेज चालवतात. ते घुग्गुस मार्गावर मुलीला कार चालवण्याचे प्रशिक्षण देत होते. यावेळी कारमध्ये रियाज यांच्या अन्य दोन मुली आणि पुतणीही उपस्थित होत्या. जन्नत हाॅलजवळ मुलीचा ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडला. यामुळे कार अनियंञित झाली. कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरूद्ध दिशेला गेली आणि समेरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात कारमधील चारही मुलींचा जागीच मृत्यू झाला तर रियाज यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक