IND Vs AUS 2nd T20 – महिला जिंकल्या पण पुरुषांनी नाराज केलं; ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव

IND Vs AUS 2nd T20 – महिला जिंकल्या पण पुरुषांनी नाराज केलं; ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार विकेटने टीम इंडियाचा एकतर्फी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 126 धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकांमध्ये यशस्वी पाठलाग केला आणि 4 विकेटने सामना जिंकला. कर्णधार मिचेश मार्श (46), ट्रेव्हिस हेड (28), जोश इंग्लिस (20) आणि मिचेल ओवेन (14) यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.

टीम इंडियाच्या महिला संघाने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाचा फडशा पाडला आणि फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, टीम इंडियाच्या पुरुष संघाने चाहत्यांना नाराज केले. आज (31 ऑक्टोबर 2025) मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाने दाणादाण उडवली. अभिषेक शर्मा (68) आणि हर्षित राणा (35) यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाची गाडी सर्वबाद 125 धावांवर थांबली. जोश हॅजलवुडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर बार्टलेट, नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आणि मार्कस स्टॉयनिसने एक विकेट घेतली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक