ताम्हिणी घाटात कारवर दगड पडून महिलेचा मृत्यू

ताम्हिणी घाटात कारवर दगड पडून महिलेचा मृत्यू

ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या धावत्या कारवर दगड पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंडेथर गावच्या हद्दीत आज सकाळी हा अपघात झाला. डोंगरावरून एक दगड घसरत आला आणि थेट कारवर आदळला. दगडाचा वेग इतका होता की कारचे सनरूफ तोडून तो महिलेच्या डोक्यात कोसळला. या दुर्घटनेत स्नेहल गुजराती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

स्नेहल गुजराती या कुटुंबासह पुण्याहून मानगावच्या दिशेने जात होत्या. त्यांची कार ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळ आली असता डोंगरातून कोसळलेल्या दरडीमधून आलेला दगड कारवर आला. हा दगड सनरूफ तोडून आत गेला आणि स्नेहल यांच्या डोक्यावर कोसळला. यामध्ये महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

अपुऱ्या उपाययोजना

दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याचे बोलले जात आहे. घाटात नागमोडी वळणे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांत असंख्य अपघात झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक Mumbai News – मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, पाच आरोपींना अटक
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत 47 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली...
महिलेला पाहून शिट्टी वाजवणे विनयभंगाचा गुन्हा; बोरिवली न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एअर इंडिया संकटात, 10 हजार कोटी रुपयांची मागितली मदत
Ratnagiri News – पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबरपासून, 12 लाख मच्छिमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी
Ratnagiri News – निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकरी आणि मच्छिमारांची कर्ज माफ करा, सरकारकडे मागणी
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नकोच! डॉ.नरेंद्र जाधव यांनी मांडले वैयक्तिक मत
आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा डाव उधळला, बीएसएफकडून एका पाकिस्तानी नागरिकाला अटक