प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अमरावतीतून निवडणूक लढणार; नवनीत राणा यांच्यासमोर कडवे आव्हान?

प्रकाश आंबेडकर यांचे बंधू अमरावतीतून निवडणूक लढणार; नवनीत राणा यांच्यासमोर कडवे आव्हान?

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत लोकसभेचा बिगुल वाजला आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. पण सध्या सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती अमरावती लोकसभा मतदारसंघाची. अनेकांचा विरोध डावलून भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पण या विजयासाठी मोठी आव्हानं त्यांच्यासमोर दिसत आहेत. बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी व्यक्तं केली आहे. तर आता प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख यांनी पण अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हं आहेत.

2 एप्रिल रोजी अर्ज भरणार

आपण स्वतः अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली आहे. 2 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्याचा टोला त्यांनी हाणला. अमरावती हा विदर्भातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे. पण त्याचा विकास रखडला आहे. त्यामुळेच आपण लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अमरावती राज्याच्या केंद्रस्थानी

गेल्या तीन ते चार वर्षांपासून अमरावती सातत्याने राज्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात महाविकास आघाडी असा सामना खूप रंगला. त्यात हनुमान चालीसापासून ते बच्चू कडू यांच्याशी वादापर्यंत ही चर्चा कायम होती. नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर लढणार हा अंदाज पण वर्तविण्यात येत होता. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी पण वंचितचा उमेदवार जाहीर केल्याने अमरावतीत बहुरंगी निवडणूक होणार हे आता निश्चित झाले आहे.

वंचित विरुद्ध आनंदराज

वंचितने अमरावती लोकसभा मतदारसंघातून कु. प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. तरस्थानिक लोकांची तसेच आंबेडकर चळवळीतील लोकांची ईच्छा होती मी निवडणुक तिथून लढावी म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मी अमरावती मधून निवडणूक लढावी, जरी तिथं वंचितचा उमेदवार असला तरी मी अमरावती मधूनच निवडणूक लढणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

बाळासाहेबांची अनेकदा भेट

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी अनेकदा भेट झाली. मणिपूरच्या घटनेनंतर भेटलो होतो. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक माहिती हवी असल्याने त्यांची भेट घेतल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितेल. आता मतपेटीतून काय होईल, ते कळेल असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्यावर निशाणा साधला. १९९० साली ओबीसीसंदर्भात तुम्ही कोणाबरोबर होता? मंडल बरोबर होता किंवा कमंडल बरोबर होता? असा सवाल त्यांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;