सांगलीतील बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी पडून, दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम

सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज शहरांसह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये 176 कोटी रुपये बचत, चालू व मुदतठेव स्वरूपात ठेवलेले 7,75,315 इतके खातेदार 10 वर्षे पुन्हा बँकेकडे फिरकले नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. अशा मयतांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क साधायचा आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे, तेथे कागदपत्रे सादर करून रक्कम काढून घ्यावी. रिझर्व्ह बँकेने यासाठी दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेत पैसे जमा

– रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदतठेव अशा स्वरूपातील 10 वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.

यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,72,838 खातेदारांची 75.72 कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या 1,61,918 खातेदारांचे 33.54 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44,939 खातेदारांचे 16.99 कोटी, आयसीआयसीआय बँकेच्या 96,917 खात्यांवर 16.15 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1,616 खात्यांवर 8.77 कोटी, युनियन बैंक ऑफ इंडियाच्या 30,075 खात्यांवर 7.65 कोटी, रत्नाकर बँकेच्या 24968 खात्यांवर 5.8 कोटी तसेच इतर बँकांनीही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे.

जनजागृती मोहीम

– केंद्र सरकारच्या वित्त विभाग व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बँकांमध्ये बचत खाते, चालू खाते व ठेव स्वरूपात असलेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या म्हणजेच अनेक खातेदार खात्यावर असलेल्या रकमा काढण्यासाठी ते बँकेकडे फिरकले नाहीत. अशा स्वरूपातील रकमा परत मिळवण्यासाठीची जनजागृती व दावा मोहीम चालू आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारच्या वित्त विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीने बँकांना दिलेले आहेत. त्याच्या अधीन राहून या मोहिमेअंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेता येईल अथवा पुढे नूतनीकरण करून ठेवताही येतील.

ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी/ वारसांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह राहुरी न्यायालयातील दोन न्यायाधीशांचे बंगले चोरट्यांनी फोडले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह
अहिल्यानगरमध्ये राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी नेमका किती मुद्देमाल लंपास केला...
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 21 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण, 18 शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मद्यधुंद दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे कुर्नुलचा अपघात, पोलिसांची माहिती
दिवाळीत पुणे बाजार समितीत टपर्‍यांचा पाऊस; बाजार समिती सचिवांचे वारंवार दुर्लक्ष, पंधरा दिवसांत दुसरी टपरी
Bihar Election – नाभिक, कुंभार आणि लोहार कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा
टायर फुटल्याने धावती एसी बस आगीच्या भक्ष्यस्थानी, 40 प्रवासी थोडक्यात बचावले
पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं, काय आहे कारण?