घटना धक्कादायक पण आमच्यासाठी विषय संपला, सरन्यायाधीश गवई म्हणाले…

घटना धक्कादायक पण आमच्यासाठी विषय संपला, सरन्यायाधीश गवई म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या बूटफेकीच्या घटनेवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. ‘‘ती घटना माझ्यासाठी आणि माझे सहकारी विनोद चंद्रन यांच्यासाठीही धक्कादायक होती, पण आमच्यासाठी आता तो विषय संपला आहे,’’ असे गवई म्हणाले.

एका सुनावणीदरम्यान अ‍ॅड. गोपाळ शंकरनारायणन यांनी दहा वर्षांपूर्वी न्यायालयात घडलेल्या एका अनुचित घटनेची आठवण सांगितली. त्या वेळी सरन्यायाधीश गवई यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

हल्लेखोर राकेश किशोर याच्यावर कुठलीही कारवाई न करण्याच्या गवई यांच्या भूमिकेशी न्या. उज्ज्वल भुयान यांनी असहमती दर्शवली. ‘‘माझे या सगळ्या प्रकारावर स्वतःचे मत आहे. ज्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला, ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, हा काही जोक नाही. ही गोष्ट कधीही विसरता येण्यासारखी नाही. हल्लेखोर व्यक्तीला त्याच्या कृत्याचा काहीही पश्चात्ताप नाही. हा संस्थेचा अपमान आहे,’’ असे न्या. भुयान म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ? केवळ 10 मिनिटं चालल्याने युरिक एसिड आणि सांधेदुखी नियंत्रणात?, तज्ज्ञांचा सल्ला काय ?
हाय युरिक एसिड म्हणजे हायपरयूरिसीमिया आता केवळ सांधेदुखीची समस्या न रहाता किडनी आणि मेटाबॉलिझमला देखील प्रभावित करत आहे. शरीरात युरिक...
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली, 14 जणांचा मृत्यू
अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
पोलीस असल्याचे सांगत घरात शिरले, सात जणांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगणारी, गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या; हर्षवर्धन सपकाळ
त्वचेच्या समस्येत गुणकारी आहे हे पतंजलीचे औषध, संशोधकांचा दावा
Jammu Kashmir – राज्यसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचा बोलबाला, तीन जागांवर विजय; भाजपला एक जागा