पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री…

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांना करण्यात आलेली मदत –

– राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना सरसकट मदत मिळणार आहे. 2069 मंडळांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.

– ज्यांची घरं पूर्णपणे पडली आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देणार आहोत. पडझड झालीय त्यांना देखील मदत दिली जाणार आहे.

– दुधाळ जनावरांना 37500 रुपयांप्रमाणे प्रती जनावर अशी मदत करणार आहोत. एनडीआरएफमधली तीन जनावरांची मर्यादा काढून टाकली आहे.

– ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32 हजार रुपये प्रती जनावर

– कुक्कुटपालनासाठी 100 रुपये प्रती कोंबडी.

– खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्याला माती आणावी लागणार आहे 47 हजार रुपये हेक्टरी रोख रक्कम देणार. तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमांतून देणार.

– बाधित विहिरी ज्यात गाळ गेलाय त्यासाठी 30000 रुपये प्रती विहीर दिले जाणार.

– इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

– शालेय महाविद्यालयीन मुलांना परिक्षा शुल्क माफी

– शेतीच्या वीजपंपाच्या पुर्नजोडणीसाठी मदत केली जाईल.

– 65 लाख हेक्टरसाठी 6176 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

– कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 18 हजार प्रती हेक्टरी
– हंगामी शेतकऱ्याला 27 हजार प्रती हेक्टरी
– बागायती शेतकऱ्याला 32 हजार प्रती हेक्टरी

– या व्यतिरिक्त ज्या 45 लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांचं पूर्ण नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना 17 हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;