जनसुराजच्या तीन उमेदवारांनी दबावाखाली आपले अर्ज घेतले मागे, प्रशांत किशोर यांचा भाजपवर आरोप
जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मंगळवारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुरज पक्षाच्या तीन उमेदवारांना भाजपच्या दबावाखाली आपले अर्ज मागे घ्यावे लागले, असा दावा त्यांनी केला.
प्रशांत किशोर यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, सत्ताधारी एनडीए विरोधी उमेदवारांना निवडणुकीत पराभवाच्या भीतीने धमकी देऊन माघार घेण्यास भाग पाडत आहे. त्यांनी असेही म्हटले की, “ही लोकशाहीची हत्या आहे आणि देशात अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती.”
“उमेदवारांना मुक्तपणे निवडणूक लढवता यावी म्हणून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी”, अशी विनंती प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाला केली. ज्या जागांवरून उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यात दानापूर, ब्रह्मपूर आणि गोपाळगंज यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले की, भाजप सुरत मॉडेलची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे इतर सर्व उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेल्याने भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List