जनसुराजच्या तीन उमेदवारांनी दबावाखाली आपले अर्ज घेतले मागे, प्रशांत किशोर यांचा भाजपवर आरोप

जनसुराजच्या तीन उमेदवारांनी दबावाखाली आपले अर्ज घेतले मागे, प्रशांत किशोर यांचा भाजपवर आरोप

जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मंगळवारी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुरज पक्षाच्या तीन उमेदवारांना भाजपच्या दबावाखाली आपले अर्ज मागे घ्यावे लागले, असा दावा त्यांनी केला.

प्रशांत किशोर यांनी एका आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, सत्ताधारी एनडीए विरोधी उमेदवारांना निवडणुकीत पराभवाच्या भीतीने धमकी देऊन माघार घेण्यास भाग पाडत आहे. त्यांनी असेही म्हटले की, “ही लोकशाहीची हत्या आहे आणि देशात अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती.”

“उमेदवारांना मुक्तपणे निवडणूक लढवता यावी म्हणून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी”, अशी विनंती प्रशांत किशोर यांनी निवडणूक आयोगाला केली. ज्या जागांवरून उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यात दानापूर, ब्रह्मपूर आणि गोपाळगंज यांचा समावेश आहे, असे ते म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले की, भाजप सुरत मॉडेलची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे इतर सर्व उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेल्याने भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले, वकील तरुणाने सात जणांना चिरडले
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
ग्लासात बॉम्ब फोडणे जीवावर बेतले, स्फोटानंतर शरीरात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणाचा मृत्यू
दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प
बिहार निवडणुकीत अंधश्रद्धेचा काळाबाजार, तांत्रिक विधींसाठी खरेदी केले जात आहेत घुबड-मुंगूस
Ratnagiri News – कोकणातला कलाकार आता मुंबईच्या रंगभूमीवर, लांजातील ‘रंग भरू दे आमुच्या रे गणा’ ची मुंबईत धडक
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोजी यांची पाच वर्षांसाठी तुरुंगात रवानगी, काय आहे प्रकरण?
दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली