महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण

महाराष्ट्रातील असा एक जिल्हा जिथे 9 महिन्यात झाला 42 जुळ्यांचा जन्म, नाव ऐकून व्हाल हैराण; काय आहे कारण

महाराष्ट्रात अनेक सरकारी रुग्णालय आहेत, जेथे मोफत रुग्णांवर उपचार होतात. शिवाय गरोदर महिलांसाठी देखील रुग्णालयात अनेक सुविधा असतात. पण महाराष्ट्रातील एक रुग्णालय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कारण या रुग्णालयात 9 महिन्यात तब्बल 42 जळ्या मुलांनी जन्म घेतला असून याचं कारण देखील समोर आहे. सध्या ज्या रुग्णलयाची चर्चा सुरु आहे ते रुग्णालय बीड सरकारी रुग्णालय आहे… जुळ्या मुलांचा वाढत्या जन्मदरावर येथील डॉक्टरांनी देखील मोठा खुलासा केला आहे. 9 महिन्यात एकाच रुग्णालयात 42 जुळ्या मुलांचा जन्म झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तुम्ही देखील चकित झाले असाल…

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी), इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळे जुळ्या मुलांचा जन्म वाढतो आहे. तज्ज्ञांच्या मते, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता काही प्रमाणात वाढली आहे.

सांगायचं झालं तर, जुळी मुले बहुतेकदा वेळेपूर्वी जन्माला येतात, त्यामुळे अनेक बाळांच्या जन्मासाठी विशेष काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. बीड सिव्हिल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) डॉ. एल.आर. तंदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या कामाचा ताण हाताळण्यासाठी ही सुविधा पूर्णपणे सुसज्ज आहे.

डॉक्टर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात जुळ्या आणि तीन मुलांच्या जन्म दरात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. गेल्या 9 महिन्यात आमच्या रुग्णालयात 42 जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे. आमचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’

‘रुग्णालयात प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता आणि नवजात बालकांच्या  काळजीसाठी समर्पित एक विशेष वैद्यकीय पथक आहे. एवढंच नाही तर, नवजात बालकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये त्यांना पुरेशा सुविधा पुरवण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आहेत.’ असं देखील डॉक्टर म्हणाले आहेत.

सांगायचं झालं तर, 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये जुळी मुले होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. आता मुली करीयरला प्राधान्य देतात त्यामुळे लग्न आणि मुल होण्यासाठी उशीर होतो.  त्यामुळे 30 वर्षांनंतर फॅमिली प्लॅनिंगचा विचार लग्नानंतर होतो. एवढंच नाही तर, बदलत्या जीवनशैलीमुळे देखील महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे प्रेग्नेंसी लवकर राहत नाही.. अशी अनेक कारण आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – मनसेचा दीपोत्सव, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ Photo – मनसेचा दीपोत्सव, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ
आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात मनसेच्या दीपोत्सवाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मनसेप्रमुख...
Ramdev Baba: बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतोय? रामदेव बाबांनी सांगितली खास योगासने
कचऱ्याचा डबा डोक्यात घातला, बेल्टने मारहाण; वंदे भारत एक्सप्रेसमध्ये IRCTC कर्मचारी भिडले
पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा वारकरी सांप्रदाय सरकार विरोधात भूमिका घेईल, महाराज मंडळींचा इशारा
Pune News – वसुबारस निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
Pune News – मार्केटयार्डात मटका, गुटखा, पत्ते जोरात; पोलिसांकडून डोळेझाक
मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांचे प्रतिपदान