अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेलं, कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

अतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेलं, कर्ज कसं फेडायचं या विवंचनेतून शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

अतिवृष्टीने खरीप पीक पाण्यात गेलं तर रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी शेतात पाणी यामुळे पेरणी करता येत नाही. शासनाची शेतकऱ्यांना दीपाळीपूर्वी मिळणारी मदत अद्यापही मिळालेली नाही. आता कर्जफेड कशी करायची याच विवंचनेतून आरणगाव (पारेवाडी) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारेवाडी येथील शेतकरी महादेव कुंडलिक राऊत (55) यांनी शेतातील नापिकी, शेतात साचलेले पाणी यामुळे अनेक दिवसांपासून नैराश्येत होते. यातच त्यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

महादेव राऊत यांच्या पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत होते. त्यामुळे घरी महादेव राऊत आणि त्यांच्या पत्नी दोघेच राहत होते. राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर पारेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;