शेवटच्या चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढले कसे? काँग्रेसचा आयोगाला सवाल

शेवटच्या चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढले कसे? काँग्रेसचा आयोगाला सवाल

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांत राज्यात 41 लाख मतदार वाढणे ही गंभीर बाब आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत 6 लाख 55 हजार 709 मते कशी वाढली, असा सवाल काँग्रेसने निवडणूक आयोगाची आकडेवारी सादर करत केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली त्या वेळी राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केले होते. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यपद्धतीप्रमाणे उमेवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणी ही सुरू ठेवली जाते. त्यानुसार सुरू ठेवलेल्या मतदार नोंदणीत 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल 6 लाख 55 हजार 709 मतदारांची वाढ होऊन राज्यातील एपूण मतदारसंख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 वर पोहचली. शेवटच्या चार दिवसांत झालेली ही मतदार नोंदणी अत्यंत संशायास्पद असल्याचे काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;