भय इथले…मरणानंतरही यातना; उदगीर तालुक्यातील वागदरीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नदीतून प्रवास

भय इथले…मरणानंतरही यातना; उदगीर तालुक्यातील वागदरीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नदीतून प्रवास

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वागदरी येथे मृत्यूनंतरही यातना भोगावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती उघड झाली आहे. येथील गावात मृत्यूची घटना घडल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून वाट काढावी लागते. रस्त्याअभावी नागरिकांना हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत.

येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी नदीतून वाट काढावी लागत आसल्याने मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आसल्याचे चित्र आहे. वागदरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी नदीतून जावे लागते. पावसाळयात या स्मशानभूमीच्या रस्त्यावर पूल नसल्याने या गावातील लोकांना अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी पाण्यातून रस्ता काढीत जीव धोक्यात टाकून अंत्यसंस्कारासाठी जावे लागत आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या नदीला मोठया प्रमाणावर पाणी असल्याने अंत्यविधीसाठी खोल पाण्यातून जावे लागते.

वागदरी येथे गावाजवळ मोठी नदी असून नदीच्या पलिकडे स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नदीला जर पूर आला तर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. रविवारी वागदरी येथे काशिनाथ सोनकांबळे यांचे निधन झाले त्यांच्यावर 13 ऑक्टोबर रोजी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना चक्क नदीच्या पाण्यातून कसरत करत जावे लागले. या गावातील लोकांना मरणानंतर ही यातना भोगाव्या लागतात याचे विदारक चित्र समोर आले आहे. गावोगाव विकासाची कोटीची उड्डाने होवून ही स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही,ना रस्त्यावर पूल नाही त्यामूळे मरणानंतर ही अंत्यसंस्कार सुध्दा ञासाविना करता येत नाही. या त्रासाकडे प्रशासन लक्ष देईल का ? असा संतप्त सवाल वागदरी ग्रामस्थातून उपस्थीत केला जात आहे.

स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर पूल उभारावा…
गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नदीतून जावे लागते.पावसाळयात नदीला पूर आणि पाणी आल्यावर स्मशानभूमीकडे जाताना पाण्यातून कधी कधी पोहत जावे लागते. मरणानंतर ही स्मशानभूमीकडे जाताना ही त्रास सोसावा लागतो. याविषयी लोकप्रतिनिधींना सांगितले त्यांनी या रस्त्याची पाहणी केली तरी पूल झाला नाही,अशी प्रतिक्रिया पांडूरंग उदगीरे या ग्रामस्थांनी दिली.

तात्काळ नदीवर पूल बांधावा…
स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर नदीवर प्रशासनाने पूल बांधावा त्यामुळे स्मशानभूमीकडे जाताना त्रास होणार नाही. लोकप्रतिनिधीनी याची पाहणी करूनही उपाययोजना केल्या नाहीत त्यामूळे प्रशासन व लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष घालावे आशी मागणी वागदरीच्या महिला सरपंचानी केली आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील...
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता
Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!
पंजाबमध्ये ‘बर्निंग ट्रेन’चा थरार; लुथियानाहून दिल्लीला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, एक महिला जखमी