महाराष्ट्राला मिळाला ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार, सांगली जिल्हा परिषदेला देशात अव्वल क्रमांक

महाराष्ट्राला मिळाला ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार, सांगली जिल्हा परिषदेला देशात अव्वल क्रमांक

देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना ई-गव्हर्नन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार सांगली जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांना सुवर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 मध्ये देशातील डिजिटल गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या श्रेणीत देशभरातील तीन लाखांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अव्वल क्रमांक पटकावून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार मिळाला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि विशाखापट्टणमचे खासदार मुथुकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या डिजिटल गव्हर्नन्स उपक्रमाअंतर्गत गावासाठी अधिकृत वेबसाईटद्वारे पूर्णपणे ऑनलाइन सेवा वितरण, कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) यावर आधारित आधुनिक अंगणवाडी, ‘माझी पंचायत अ‍ॅप’द्वारे तक्रार निवारण आणि ‘निर्णय अ‍ॅप’द्वारे ग्रामसभा निर्णयांचे ऑनलाइन प्रकाशन यांचा समावेश आहे. सांगली येथे येण्यापूर्वी विशाल नरवाडे हे धुळे जिह्याचे सीईओ म्हणून कार्यरत होते.

सांगलीत डिजिटल क्रांती

या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे यशस्वी मॉडेल सांगली जिह्यातील सर्व 700 ग्रामपंचायतींमध्ये राबविणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सांगली जिह्यात डिजिटल क्रांती होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs AUS – पहिल्या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ‘बाद’, कांगारुंना एकामागोमाग पाच धक्के IND vs AUS – पहिल्या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ‘बाद’, कांगारुंना एकामागोमाग पाच धक्के
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात 19 ऑक्टोबरपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा धक्का...
पुण्यातील जैन हॉस्टेलचा भूखंड लाटण्याचा डाव, जैन समुदायाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
भय इथले…मरणानंतरही यातना; उदगीर तालुक्यातील वागदरीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नदीतून प्रवास
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सढळ हातानं मदत करण्याची राज्य सरकारची तयारी नसल्यानं ‘काळी दिवाळी’ साजरी करावी लागतेय! – शरद पवार
नेपाळनंतर मादागास्करमध्ये Gen Z क्रांती; लष्कराच्या हाती सत्ता, कर्नल बनले देशाचे राष्ट्रपती
मुंबईत ठाकरे यांचाच उत्सव होणार; मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव साजरा होणार – संजय राऊत
भ्रष्ट मंत्र्यांचा मलीदा, थैल्या दिल्लीत पोहचत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांना अभय आहे; संजय राऊत यांचा आरोप