सहलीहून घरी परतत असतानाच काळाचा घाला, ट्रक-कार अपघातात 5 जणांचा मृत्यू

सहलीहून घरी परतत असतानाच काळाचा घाला, ट्रक-कार अपघातात 5 जणांचा मृत्यू

सहलीवरून घरी परतत असतानाच बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात अकलघरिया गावाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांची ओळख पटवली जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील प्रवासी कोलकात्याचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन कोलकात्याला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी कारने बिलासपूरला जात होते. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पवईत उद्या नवनाथ महोत्सव पवईत उद्या नवनाथ महोत्सव
पवई येथे उद्या, बुधवारी नवनाथ महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त ‘अलख निरंजन’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे. पवईत...
अहिल्यानगरमधील शिवसेना पदाधिकारी जाहीर; शशिकांत गाडे लोकसभा संघटक, तर राजेंद्र दळवी जिल्हाप्रमुखपदी, किरण काळे महानगरप्रमुख
दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी
योगी आदित्यनाथ म्हणाले दुसरा जीना जन्माला येऊ देऊ नका!
भांडुप पश्चिम विधानसभेतील युवासेना पदांकरिता रविवारी मुलाखती
शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्यापासून अंतिम सुनावणी
सातबारा, प्रॉपर्टी कार्ड, दस्त नोंदणी यांची स्वतंत्र चौकशी; खारगे समितीची पहिली बैठक