सहलीहून घरी परतत असतानाच काळाचा घाला, ट्रक-कार अपघातात 5 जणांचा मृत्यू
सहलीवरून घरी परतत असतानाच बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात अकलघरिया गावाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांची ओळख पटवली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील प्रवासी कोलकात्याचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन कोलकात्याला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी कारने बिलासपूरला जात होते. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List