आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादा उल्लंघनाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात; सोमवारी सुनावणीची शक्यता

आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादा उल्लंघनाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात; सोमवारी सुनावणीची शक्यता

एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा न ओलांडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र काही राज्यांनी ही मर्यादा ओलांडून विशिष्ट प्रवर्गांना आरक्षण दिले आहे. यावरुन कायदेशीर पेच निर्माण झाला असतानाच याच 50 टक्के मर्यादा उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तेलंगणा सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांना 42 टक्के आरक्षण देताना एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. तेलंगणा सरकारच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील कोठापल्ली येथील रहिवासी वंगा गोपाल रेड्डी यांनी तेलंगणा सरकारच्या निर्णयाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या तेलंगणा राज्यात अनुसूचित जातीसाठी 15 टक्के आरक्षण आणि अनुसूचित जमातीसाठी 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे एकूण आरक्षण 67 टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या 50 टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

तेलंगणा पंचायत राज कायदा,2018 च्या कलम ‘285अ’चा हवाला देत याचिकाकर्ते गोपाल रेड्डी यांनी राज्यातील आरक्षणाची सद्यस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. तेलंगणा पंचायत राज कायदा,2018 या कायद्यातील तरतूद के. कृष्ण मूर्ती विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुरूप 50 टक्के मर्यादेचे संहिताकरण करते. ही वैधानिक मर्यादा असूनही राज्य सरकारने संविधान आणि कायदा या दोन्हींचे उल्लंघन करून वादग्रस्त जीआर जारी केला आहे, असे म्हणणे रेड्डी यांनी मांडले आहे.

याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सुनावणीकडे तेलंगणासह महाराष्ट्र व इतर राज्यांचेही लक्ष लागले आहे. महाराष्ट्र सरकारनेही 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे तेलंगणाच्या प्रकरणातील निर्णय महाराष्ट्रासाठीही महत्वपूर्ण ठरू शकतो, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली; ऐन दिवाळीत GRAP-2 लागू दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली; ऐन दिवाळीत GRAP-2 लागू
ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यात GRAP 2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक...
हवेत असताना केबिनमध्ये आग, चीनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुखरुप
चेन्नईत चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना अभिनेता विजयकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत
तेलंगणामध्ये आमदार होण्यासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २१ होणार, सरकार विधानसभेत मांडणार प्रस्ताव
6 महिन्यांनंतर त्याचा आवाज परत मिळाला, डॉक्टरांनी केली दुर्लभ लॅरिंजियल रि- इनर्वेशन सर्जरी
स्वयंपाक करताना कोणते तेल वापरणे आरोग्यासाठी चांगले? तुम्ही पण हेच वापरता का?
तुम्हीही सतत नखे खाता का? अत्ताच सोडा ही सवय अन्यथा हा आजार होण्याचा धोका