‘त्यांच्या बापाची जहागिरी थोडी आहे’, बच्चू कडू प्रचंड संतापले

‘त्यांच्या बापाची जहागिरी थोडी आहे’, बच्चू कडू प्रचंड संतापले

खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अधिकृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पण याला महायुतीमधील मित्रपक्षांचा तीव्र विरोध असल्याचं बघायला मिळत आहे. आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आपण नवनीत राणा यांचं काम करणार नाही. याउलट नवनीत राणा यांचा कसा पराभव होईल, यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल, असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ या दोन्ही नेत्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचा सुरुवातीपासून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल मोठा दावा केला होता. बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ या नवनीत राणा जिंकून याव्यात यासाठी प्रचार करतील, असं रवी राणा म्हणाले होते. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांना रवी राणा यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही राणांच्या वक्तव्यानुसार त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता “त्यांच्या बापाची जाहागिरी थोडीय”, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

‘नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार’

“आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु. आम्ही केल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू, एकंदरीत काय रणनीती आहे त्यापद्धतीने उमेदवार द्यायचा का, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाहीत. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. “आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

‘आम्ही लाचारी पत्कारणार नाही’

“आता काम सरो वैद्य मरो अशी अवस्था आहे. त्यांना असं वाटतंय की आमची काही गरज नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना एकंदरीत आमची गरज नाही. त्यामुळे आम्ही लाचारी पत्कारणार नाही. राणांनी काही करण्याचा संबंध नाही. आमचा विरोध कायम राहील. नवनीत राणा स्वत: भेटल्या तरी आमचा विरोध कायम राहील. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू. याचा फटका कुणाला बसेल हा विचार आमच्यापेक्षा भाजपने करायला हवा. त्यांनीच मीठाचा खडा टाकला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;