बिहारसारख्या मोठ्या राज्यात फक्त 120 प्रकरणांमध्येच आक्षेप? मतदार यादी फेरतपासणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले

बिहारसारख्या मोठ्या राज्यात फक्त 120 प्रकरणांमध्येच आक्षेप? मतदार यादी फेरतपासणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले

बिहारसारख्या इतक्या मोठ्या राज्यात केवळ 120 प्रकरणांमध्येच आक्षेप येत आहे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने ठरवलेली प्रक्रिया ही मानक असून ती पाळली गेली पाहिजे. तसेच आधार कार्डवर इतका भर का दिला जात आहे? आम्ही पुनः पुन्हा एकच आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले.

अंतिम मतदार यादी 1 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल असे निर्देश देतानाच राजकीय पक्षांनीही सक्रिय राहावे आणि मतदारांना त्यांचे आक्षेप नोंदवण्यास मदत करावी. ठोस उदाहरणे सादर केल्यास आधार कार्डवरील वादावर 8 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी घेऊ, असेही न्यायालय म्हणाले.

याचिकेत काय?

अर्ज न करता अनेक मतदारांची नावे मसुदा यादीत समाविष्ट करण्यात आली. मोठय़ा संख्येने लोक मतदार यादीतून नावे काढून टाकण्यासाठी अर्ज करत आहेत. आयोग पारदर्शकतेने त्यांचे नियम पाळत नाही, अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रशांत भूषण यांनी मांडली.

निवडणूक आयोग काय म्हणाले?

निवडणूक आयोगाच्या वकिलांनी 7.24 कोटी मतदारांपैकी 99.5 टक्के मतदारांनी कागदपत्रे सादर केली. आतापर्यंत 1.34 लाखांहून अधिक लोकांनी नाव काढून टाकण्याची विनंती केली आहे. तसेच नवीन नावे जोडण्यासाठी अर्ज खूपच मर्यादित आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतरही हरकती आणि दावे सादर करता येतील आणि पात्र लोकांचा समावेश अंतिम मतदार यादीत केला जाईल, असे निवडणूक आयोग म्हणाले.

1 सप्टेंबरनंतरही नोंदवता येणार आक्षेप

बिहारमधील मतदार यादी फेरतपासणी मोहिमेदरम्यान मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी सादर करण्यात येणारी कागदपत्रे तसेच विविध दावे आणि आक्षेप 1 सप्टेंबरनंतरही नोंदवले जाऊ शकतात. त्यांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन निवडणूक आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाला दिले. निवडणूक आयोगानेच मुदत वाढवून दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बिहार मतदार यादी फेरतपासणीप्रकरणी सुनावणी करताना अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करणाऱया याचिका फेटाळून लावल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;