Beed News – माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावास पुराचा वेढा

Beed News – माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावास पुराचा वेढा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या दिड हजार लोकवस्तीच्या गावास खेटून सिंदफणा नदी वाहते व ती पुढे जाऊन मंजरथ येथे गोदावरी नदीस मिळते. सध्या सिंदफणा नदी पात्रात ८५ हजार क्युसेसने विसर्ग सुरू असल्याने ती काठोकाठ भरून वाहत आहे. तसेच गोदावरी नदीदेखील तुडूंब भरून वाहत असल्याने, सांडस चिंचोली गावाला पूराचा वेढा पडला आहे. नदीपात्रातून बाहेर आलेल्या पाण्याने गावांना बेटाचे स्वरूप आले आहे.

गावचा संपर्क तुटलेला आहे. आपत्कालीन परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून असून गटविकास अधिकारी जोस्तना मुळीक यांनी अलीकडील गाव देपेगांव येथून चिंचोली गावकऱ्यांशी संपर्क ठेवला आहे. यापूर्वी या गावात १९९१ व २००५ साली आपत्कालीन परिस्थितीत लष्कराच्या सहाय्याने लोकांना मदतकार्य राबवण्यात आले होते. आता आम्ही सर्व परस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून गावकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने...
31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्याच पाहिजेत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?
Rain Update: जोरदार पावसामुळे जालना जलमय; अनेकांच्या घरात पाणी शिरले, विजेचा कडकडाटाने घबराट
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजूरी, अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय