देशात प्रत्येक तिसरा विद्यार्थी घेतो खासगी शिकवणी, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून उघड; राष्ट्रीय शिक्षण धोरण फेल

देशात प्रत्येक तिसरा विद्यार्थी घेतो खासगी शिकवणी, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून उघड; राष्ट्रीय शिक्षण धोरण फेल

देशभरात तब्बल एक तृतियांश म्हणजेच प्रत्येक तिसरा विद्यार्थी खासगी शिकवणी घेत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात तर हा एक ट्रेंडच बनला आहे. यावरून सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्यप्रकारे शिकवले जात नसल्याचेच समोर आले असून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे आणि मोदी सरकारचे राष्ट्रीय शिक्षण धोरण फेल ठरल्याचेच उघड झाले आहे.

केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. देशभरातील सरकारी शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. सरकारी शाळांमध्ये एकूण 55.9 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ग्रामीण भागात 66.0 टक्के विद्यार्थी असून शहरी भागात 30.1 टक्के विद्यार्थी सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत. तर खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 31.9 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

असा वाढतोय ट्रेंड

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणांतर्गत शहरी भागात 30 टक्के तर ग्रामीण भागात 25.5 टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी घेत आहेत. 52,085 घरे आणि 57,742 विद्यार्थ्यांच्या मुलाखतींद्वार सरकारने खासगी शिकवणी घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा मिळवला. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात खासगी शिकवणीवर भरमसाट खर्च करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी Breaking News – शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी
शिवसेनेकडून दरवर्षी मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येत शिवसैनिकांसह अनेकजण विचारांचे सोने लुटण्यासाठी येतात....
नेपाळनंतर आता फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध निदर्शने, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले
…तर राहुल गांधी म्हणतात तसेच पुन्हा वोटचोरीच झाली ना! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
त्यानं नर्तिकेवर जीव ओवाळून टाकला, ती मात्र संपर्कात राहिना; बीडच्या माजी उपसरपंचानं स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं
कच्चे केळे खाल्ल्याने आरोग्यासाठी होतील ‘हे’ अद्भुत फायदे
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, राज ठाकरे यांची भेट घेतली
दररोज नाश्त्यात एक वाटी भिजवलेले चणे खाण्याचे शरीराला काय फायदे मिळतील, वाचा