वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; अकरावी प्रवेशावरुन आदित्य ठाकरे यांची टीका

वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; अकरावी प्रवेशावरुन आदित्य ठाकरे यांची टीका

राज्यभरातील तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांवर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची टांगती तलवार आहे. राज्यात 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करत त्यांना जबाबदारीची जाणीव करुन दिली आहे.

आदित्या ठाकरे यांनी ट्वीट करत सरकारचा समाचार घेतला. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घातले आहे. सतत वेबसाइट क्रॅश, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ… होत आहे. परिणामी ऑगस्ट महिना संपत आला तरीही सुमारे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक बिघाडाशिवाय स्थिर प्रवेश प्रक्रिया राबवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण सरकार ह्या जबाबदारीपासून पळतंय किंबहुना त्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाहीए, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर

अकरावीच्या प्रवेशापासून 2 लाख विद्यार्थी वंचित असल्यामुळे शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन केले आहे. 23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येईल. 25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल.

अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक
72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी एकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. करणसिंह खारवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल...
महिला IPS अधिकाऱ्याला धमकी प्रकरण – अजित पवार यांना फोन करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा
सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीचा वसा, विलेपार्ले जुहू गणेश मंडळाचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिवसेनेतर्फे गणेशभक्तांना पाणी, सरबत वाटप
आरे भास्कर विसर्जनस्थळी भक्तिगीतांऐवजी बिभत्स नाच-गाणी, पालिकेच्या नियंत्रण कक्षात भाजप कार्यकर्त्यांची मग्रुरी, शिवसेनेने घेतला तीव्र आक्षेप ठेकदारासह इतरांवर कारवाईची आयुक्तांकडे मागणी
कोकणात बाप्पाला वाजतगाजत निरोप
मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन, पुण्यात निर्बंधमुक्त 34 तास 44 मिनिटे!