तिकीट नसेल तर दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये ‘नो एण्ट्री’

तिकीट नसेल तर दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये ‘नो एण्ट्री’

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे आता तिकीट असणे आवश्यक आहे. सणासुदीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने एक निर्णय घेतला आहे. ज्या प्रवाशाकडे रेल्वेचे तिकीट नसेल अशा प्रवाशांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार नाही. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर हा नियम लागू करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. याची चाचणी एक महिना चालणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर त्याची देशभरात अंमलबजावणी केली जाऊ शकते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये नवी दिल्ली स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली होती.

आता सणासुदीत पुन्हा एकदा प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वेने हा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याआधी रेल्वेने अनारक्षित कोचसाठी केवळ 150 तिकीट जारी केले होते. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवता आले होते. एका कोचची प्रवासी क्षमता 80 प्रवाशांची असते. त्यात 300 ते 400 प्रवासी घुसतात. यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडू शकते. नव्या योजनेनुसार, स्टेशनपासून प्रत्येक अनारक्षित कोचसाठी केवळ 150 तिकिटे जारी केली जातील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक गुन्हे वृत्त – 72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी नोकराला अटक
72 लाखांचे दागिने चोरी प्रकरणी एकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. करणसिंह खारवार असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल...
महिला IPS अधिकाऱ्याला धमकी प्रकरण – अजित पवार यांना फोन करणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा
सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीचा वसा, विलेपार्ले जुहू गणेश मंडळाचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिवसेनेतर्फे गणेशभक्तांना पाणी, सरबत वाटप
आरे भास्कर विसर्जनस्थळी भक्तिगीतांऐवजी बिभत्स नाच-गाणी, पालिकेच्या नियंत्रण कक्षात भाजप कार्यकर्त्यांची मग्रुरी, शिवसेनेने घेतला तीव्र आक्षेप ठेकदारासह इतरांवर कारवाईची आयुक्तांकडे मागणी
कोकणात बाप्पाला वाजतगाजत निरोप
मानाच्या गणपतींचे वेळेत विसर्जन, पुण्यात निर्बंधमुक्त 34 तास 44 मिनिटे!