तुमचे मत गेले की रेशन कार्डही जाणार! राहुल गांधी यांनी केले मतदारांना सावध

तुमचे मत गेले की रेशन कार्डही जाणार! राहुल गांधी यांनी केले मतदारांना सावध

’आजच्या हिंदुस्थानमध्ये गरीबांकडे फक्त मताचा अधिकार राहिला आहे. तोही चोरीला गेला तर हातात काहीच राहणार नाही. मत गेले की रेशनकार्ड, जमीन जाणार, तुमचा सगळं काही जाणार. त्यामुळे मतांची चोरी होऊ देऊ नका,’ असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केले.

राहुल यांची मतदार अधिकार यात्रा सध्या बिहारमधील सैदपूरमध्ये आहे. तेथे जनतेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा भाजप व निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. गेल्या काही वर्षांपासून भाजप व आयोग मिळून निवडणूक चोरी करत आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, मध्य प्रदेशची निवडणूक चोरली गेली. बिहारची याआधीची निवडणूकही चोरी झाली होती हेही एकदा समोर येईल, असा दावाही राहुल यांनी केला.

‘एसआयआर’वरून संसदेचे कामकाज बाधित

मतदारयाद्यांच्या फेरपडताळणीच्या (एसआयआर) मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरू असलेला गदारोळ अधिवेशन संपत येत असले तरी कायम आहे. आजही दोन्ही सभागृहांत याच मुद्दय़ावरून गदारोळ झाला आणि कामकाज बाधित झाले.

निवडणूक आयुक्तांनी आता स्वतःचा पक्ष काढावा – बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर ः देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयुक्तांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाला आयुक्तांनी उत्तर दिले नाही. 45 दिवसांत सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे, डिजिटल स्वरूपातील यादी दिली नाही? कागदांचे गठ्ठे का दिले? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य,...
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक
Solapur News – सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एसटी आणि ट्रकची धडक, 16 प्रवासी जखमी
Ratnagiri News – दुर्वास पाटील प्रकरणात जयगड पोलीस दोषी आढळल्यास कारवाई होणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा
विधानसभेत मंजूर झालेलं विधेयक राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय