राहुल गांधींची 17 ऑगस्टपासून ‘मतदान अधिकार यात्रा’, 16 दिवस करणार बिहारमध्ये प्रवास

राहुल गांधींची 17 ऑगस्टपासून ‘मतदान अधिकार यात्रा’, 16 दिवस करणार बिहारमध्ये प्रवास

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची ‘मतदान अधिकार यात्रा’ बिहारमधील सासाराम येथून 17 ऑगस्टपासून सुरू होत. या यात्रेत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही सहभागी होणार आहेत. या यात्रेचा अररिया येथे समारोप होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांची ही यात्रा सकाळी 8 वाजता शेखपुरा येथील तीन मोहनी दुर्गा मंदिर येथून सुरू होईल. ही 1,300 किमी लांबीची यात्रा बिहारमधील 25 जिल्ह्यांमधून जाईल आणि 16 दिवस चालेल. या यात्रेत इंडिया आघाडीचे सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत

याबद्दल माहिती देताना काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणाले की, राहुल गांधी देशातील मताधिकार मजबूत करण्यासाठी निघाले आहेत. ते देशाचे संविधान, लोकशाही आणि मतदारांना बळकट करण्यासाठी बिहारमध्ये येत आहेत. राहुल गांधी बिहार आणि देशाचे भविष्य बळकट करण्यासाठी मतदार हक्क यात्रेला निघाले आहेत. बिहारमधील मतदार यादीतील दुरुस्तीविरुद्ध आणि मत चोरीविरुद्धच्या लढाईला जनआंदोलन बनवण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maratha Reservation – मुंबईत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर Maratha Reservation – मुंबईत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील मराठा आंदोलक विजय चंद्रकांत घोगरे (35) यांचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मनोज जरांगे पाटील...
मराठा बांधवांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा, हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू
भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी
Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू
सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल
21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल