निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद, SIR वर काय बोलणार याकडे लक्ष

निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद, SIR वर काय बोलणार याकडे लक्ष

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) रविवार दुपारी 3 वाजता एक पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) संदर्भात महत्त्वाची माहिती जाहीर करणार आहे, अशी अपेक्षा आहे. या घोषणेकडे राजकीय पक्ष, माध्यमे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेचा उद्देश स्पष्टपणे जाहीर केलेला नसला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये आगामी निवडणुका, मतदार यादी अद्ययावत करणे, तसेच संदिग्ध निवडणूक निकालांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः, SIR प्रणालीबाबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोग यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करू शकतो.

दरम्यान, अलिकडेच काँग्रेससह विरोधी पक्षांनी मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. निवडणूक आयोग या आरोपांना कसे सामोरे जाणार आणि एसआयआरबाबत कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माचा ड्रिंक प्यायल्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो? जाणून घ्या तज्ञांचे मत…. माचा ड्रिंक प्यायल्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो? जाणून घ्या तज्ञांचे मत….
भारतामध्ये अनेकांना चहा पिण्याची सवय असते. आजकाल अनेकांना माचा चहा पिण्यास आवड दिसत आहे. माचा चहा हे जपानमध्ये एक लोकप्रिय...
Maratha Reservation – मुंबईत मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मराठा बांधवांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा, हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे! उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
इस्रायलचा येमेनवर हवाई हल्ला, हुथी पंतप्रधानांचा मृत्यू
भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी
Ratnagiri News – प्रेमसंबंधातून तरूणीचा आंबा घाटात खून, मृतदेहाचा शोध सुरू
सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल