या कारणामुळे दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती

या कारणामुळे दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी झाली, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती

महाकुंभ दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जेव्हा गर्दीत चेंगराचेंगरी झाली, त्याचे कारण रेल्वेमंत्री यांनी शुक्रवारी संसदेत स्पष्ट केले. एका प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाचे सामान खाली पडल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली आणि त्याचमुळे त्यामुळे इतका मोठा अपघात घडला. या अपघातात 11 महिलांसह 4 लहान मुलांचा मृत्यू झाला होता.

समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी या प्रकरणी लेखी प्रश्न विचारला होता, त्याच्या उत्तरात रेल्वेमंत्री म्हणाले की, एका उच्चस्तरीय चौकशी समितीने 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघाताच्या प्राथमिक कारणं समोर आणली आहेत. एक व्यक्ती डोक्यावरून सामान नेत होता, हे सामान खाली पडले आणि त्याचमुळे चेंगराचेंगरी झाली.

रेल्वेमंत्री म्हणाले की, संध्याकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 ला जोडणाऱ्या जिन्यावर ही चेंगराचेंगरी झाली. त्या वेळी प्रयागराजमध्ये महाकुंभ उत्सव चालू होता आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हजारो प्रवासी स्टेशनवर जमले होते.

अश्विनी वैष्णव यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, एका प्रवाशाच्या डोक्यावरून जड सामान खाली पडले आणि त्यामुळे प्लॅटफॉर्म 14/15 च्या जिन्यांवर अचानक ताण निर्माण झाला, ज्यामुळे प्रवासी घसरून पडले. ही घटना रात्री 8.48 वाजता फूटओव्हर ब्रिज क्रमांक तीनवर घडली.

अनेकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला हे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले. गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक प्रोटोकॉल अस्तित्वात होते, तरीही रात्री 8.15 नंतर फूटओव्हर ब्रिजवर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली होती, अशी माहिती चौकशी अहवालात हे स्पष्ट झाले आहे. तसेच अपघात होण्यापूर्वी अनेक प्रवासी त्यांच्या डोक्यावर जड सामान घेऊन जात होते, ज्यामुळे 25 फूट रुंद असलेला पण गर्दीच्या दृष्टीने अरुंद वाटणारा फूटओव्हर ब्रिजवर येण्या-जाण्यास अडचणी येत होत्या असे निरीक्षणही समितीने नेमले आहे.

त्या संध्याकाळी रेल्वेने एका तासात 1500 च्या दराने एकूण 7600 अनारक्षित तिकिटं विकली होती अशी माहिती समोर आली होती. तसेच संध्याकाळी 6 नंतर स्टेशनवरील गर्दी झपाट्याने वाढत गेली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी…. चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी….
निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. लोक पोषण वाढवण्यासाठी त्यांच्या ताटात अनेक प्रकारच्या...
भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे तुमचं वजन खरच कमी होतं का?
Thane News – बदलापूरमध्ये भरधाव ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
Maghi Ganeshotsav 2025 – कोर्टाच्या कचाट्यातून बाहेर, 177 दिवसांनी होणार चारकोपच्या राजाचं विसर्जन
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाचा दणका, बलात्कारप्रकरणी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; आरोपीचा शोध सुरू