धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा अजित पवारांना थेट इशारा

धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा! मनोज जरांगे यांचा अजित पवारांना थेट इशारा

महादेव मुंडे, संतोष देशमुख यांच्यासह बीड जिल्हयात झालेल्या प्रत्येक खुनाचा तपास लागलाच पाहिजे, तोपर्यंत धनंजय मुंडे यांना जवळ कराल तर याद राखा ! असा स्पष्ट इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मुंडे यांना राजकीय आश्रय देण्याचा प्रयत्नही झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुमचे सगळे उमेदवार पाडले जातील, असेही जरांगे म्हणाले.

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या अमानुष हत्येला दोन वर्षे उलटून गेले. आजही मुंडे कुटुंब न्यायासाठी वणवण करीत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी दोन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु वाल्मीक कराडची चाकरी करणाऱ्या पोलीस प्रशासनाला पाझर फुटला नाही. मुंडे कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तसेच लढा उभारण्याचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी बीड येथे बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या बैठकीला मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, बाळा बांगरसह मोठ्या प्रमाणावर बीडकरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात नो एन्ट्री !

मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना आठ दिवसांत महादेव मुंडे यांचे मारेकरी पकडा, लोकांना कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा दिला. परळीतील लाभार्थ्यांच्या टोळ्या संपवण्यासाठी पुढे या, असे आवाहनही त्यांनी केले. मंत्रिपद गेल्यापासून काहीजण अस्वस्थ आहेत. कशासाठी पाहिजे मंत्रिपद? लोकांना मारण्यासाठी, टोळ्या पोसण्यासाठी? खंडण्या वसूल करण्यासाठी? आता हे चालणार नाही. अजित पवार यांनीही अशा माणसांना दूरच ठेवावे, नसता आगामी निवडणुकीत तुमचे उमेदवार ठरवून पाडले जातील, असे जरांगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी…. चुकूनही ‘या’ अंकुरलेल्या भाज्या खाऊ नका, तुमच्या आरोग्यासाठी ठरेल विषारी….
निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. लोक पोषण वाढवण्यासाठी त्यांच्या ताटात अनेक प्रकारच्या...
भोपळ्याच्या बिया खाल्ल्यामुळे तुमचं वजन खरच कमी होतं का?
Thane News – बदलापूरमध्ये भरधाव ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
कोळी बांधवांना हुसकावण्याची भाषा करत असाल तर शिवसेना तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
Maghi Ganeshotsav 2025 – कोर्टाच्या कचाट्यातून बाहेर, 177 दिवसांनी होणार चारकोपच्या राजाचं विसर्जन
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाचा दणका, बलात्कारप्रकरणी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू; आरोपीचा शोध सुरू