येऊरमधील दोनशे बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा! मुंबई हायकोर्टाचे आदेश; ठाणे पालिकेला तिसऱ्यांदा झापले

येऊरमधील दोनशे बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा! मुंबई हायकोर्टाचे आदेश; ठाणे पालिकेला तिसऱ्यांदा झापले

निसर्गरम्य येऊरमधील दोनशे बांधकामांवर तत्काळ बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करा, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला दिले. त्यामुळे अधिकारी, धनदांडगे आणि बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले असून शहरातील बेकायदा बांधकामांबाबत न्यायालयाने पालिका प्रशासनाला तिसऱ्यांदा झापले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांत अहवाल देखील सादर करण्यास सांगितल्याने प्रशासनाची भागम्भाग झाली आहे.

मुंब्यातील खान कंपाऊंडमधील 21 बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश देऊन उच्च न्यायालयाने ठाणे पालिकेला पहिला मोठा झटका दिला. त्यानंतर दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सौरभ राव यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि प्रशासनाने खान कंपाऊंडमधील सर्व इमारती जमीनदोस्त केल्या. त्यानंतर मागील आठवड्यात याच परिसरातील 11 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. यामध्ये दोन स्वतंत्र याचिका

2009 पासून याचिका न्यायालयात प्रलंबित

येऊरमधील बेकायदा बांधकामांसंदर्भात 2009 साली येऊरमधीलच याचिकाकर्ते बळीराम जाधव यांनी याचिका दाखल केली होती. 2009 पासून ही याचिका न्यायालयात प्रलंबित होती. दरम्यान या याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच याचिकाकर्ते बळीराम जाधव यांचा 6 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. ही याचिका जेव्हा न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावेळी ठाणे महापालिकेने येऊरमध्ये 200 अनधिकृत बांधकामे असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
दखल करण्यात आल्या होत्या. आता उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला थेट तिसरा मोठा दणका देत निसर्गरम्य येऊरमधील २०० बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकण्याचे आदेश दिले आहेत.

बंगले, हॉटेल व्यावसायिक रडारवर

ठाणे पालिकेने यापूर्वीच येऊरमधील टर्फवर थातूरमातूर कारवाईला सुरुवात केली होती. तसेच बांधकाम साहित्य परवानगी असल्याशिवाय घेऊन जाण्यास निर्बंध टाकण्यात आले आहेत. आता तर थेट 200 बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याने बंगलेमालक, हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्टचालक रडारवर आले असून टर्फ यांच्यावर टाच आली आहे.

याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी येऊरमधील बेकायदा बांधकामे तत्काळ पाडण्याचे आदेश दिले. तसेच कारवाई केल्यानंतर यासंदर्भातील अहवाल सहा महिन्यांत न्यायालयात सादर करावा असे बजावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तेरा पिछा ना मै छोडूंगा, ‘डोलांड’चे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना; हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले, ट्रम्पना नोबेल द्या! व्हाईट हाऊसची मागणी तेरा पिछा ना मै छोडूंगा, ‘डोलांड’चे भूत मानगुटीवरून उतरता उतरेना; हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले, ट्रम्पना नोबेल द्या! व्हाईट हाऊसची मागणी
मित्र ‘डोलांड’चे भूत मानगुटीवर बसले आहे आणि ते काही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पिच्छा सोडायला तयार नाही. आता तर व्हाईट हाऊसनेच...
निवडणूक आयोगाविरुद्ध माझ्याकडे पुराव्याचा अॅटमबॉम्ब! लवकरच फोडणार!! राहुल गांधी यांचा मतचोरीवरून हल्ला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, उद्धव ठाकरे यांचे पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
दौंडच्या यवतमध्ये जातीय दंग्याचा भडका; जाळपोळ, दगडफेक, बंद आणि तणाव… पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडूल्या
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा, ‘श्यामची आई’ ठरला सर्वोत्पृष्ट मराठी चित्रपट
सुराज्यासाठी काम करणार! नितीन गडकरी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित
धनुष्यबाणाची सुनावणी 23 ऑगस्टनंतर, सुप्रीम कोर्ट मूळ याचिका अंतरिम अर्जाचा एकत्रित विचार करणार