निवडणूक आयोगाने भाजपसाठी मंत चोरली, कुणालाही सोडणार नाही; राहुल गांधी यांचा घणाघात

निवडणूक आयोगाने भाजपसाठी मंत चोरली, कुणालाही सोडणार नाही; राहुल गांधी यांचा घणाघात

निवडणूक आयोगाने भाजपसाठी मतं चोरली आणि याचे आपल्याकडे ठोस पुरावे आहेत असा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच यात निवडणुक आयोगाचे जे जे अधिकारी आहेत त्यांना सोडणार नाही असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतं चोरली आहेत याचे ठोस पुरावे आम्हाला मिळाले आहेत. हे मी गांभीर्याने बोलतोय, माझ्याकडे याचे 100 टक्के पुरावे आहेत. जर आम्ही हे पुरावे बाहेर आणले तर सगळ्यांना कळेल की निवडणूक आयोग मतं चोरत आहेत. निवडणूक आयोगाने भाजपसाठी ही मतं चोरली आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत आम्हाला संशय होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमचा संशय आणखी बळावला. महाराष्ट्रात एक कोटी मतदार वाढले होते. यात आम्ही सखोल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाने याबाबतीत आम्हाला काहीच सहकार्य केले नाही. तेव्हा आम्ही आमच्या पद्धतीने तपास केला. सहा महिन्यात आम्ही पुरावे गोळा केला. हे पुरावे म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब आहे. हा बॉम्ब जेव्हा फुटेल तेव्हा देशात निवडणूक आयोग दिसणारच नाही. जे लोक ही मतं चोरत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. उद्या हे लोक निवृत्त होतील तरी त्यांना आम्ही सोडणार नाही. कारण तुम्ही देशाविरोधात काम करत आहात असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय...
‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच