चिखलीतील सर्पमित्रांनी दिले दोन अजगरांना जीवनदान
On
रांगव गावात अजगराला जीवनदान देण्याचे काम चिखलीतील तरुण सर्पमित्रांनी केले. पावसाळा सुरू झाला की, कोकणात घरात जनावरे यायला सुरुवात होते. अशावेळी वाडीतील जुन्या लोकांचा कल साधारणपणे सापांना मारून टाकण्याकडेच असतो. परंतु आता काही धाडशी तरुण सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देतात त्यामुळे नैसर्गिक चक्र उत्तम राहते. चिखली गावातील अक्षय मोहिते व सम्यक पवार हे दोघे जण आजूबाजूच्या गावात कोणाच्या घरी साप आल्यास त्वरित मदतीला धावून जाण्याचे काम करतात.
चिखलीतील रिक्षा चालक सुशील जाधव यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात अजगर घुसला होता. जाधव सकाळी कोंबड्यांना उघडायला गेले असताना त्यांना एक कोंबडी मेलेली दिसून आली. आत नीट पाहिले असता अजगर दिसून आला. सर्पमित्रांना पाचारण केल्यावर त्यांनी या 7 फुटी अजगराला पकडण्याचे धाडस केले.
रांगव येथील कीर्तनकार हरिबुवा तुळसणकर यांच्या घरामागील खोपटीत एक अजगर घुसला असता त्यांनी या सर्पमित्रांना बोलावले. या दोघांनी एक तासाच्या प्रयत्नानंतर अजगर पकडण्यात यश मिळविले. यावेळी त्यांच्या सोबत आदर्श मोहिते, अभी मोहिते, आयुष पवार हे मित्र देखील मदतीसाठी गेले होते. अजगराला पकडून त्यांनी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.सर्पमित्रांच्या या धाडसाचे सर्व जण कौतुक करत आहेत.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List