Navi Mumbai Accident – तुर्भेत चालकाचे नियंत्रण सुटले अन् NMMT बसने सहा जणांना उडवले

Navi Mumbai Accident – तुर्भेत चालकाचे नियंत्रण सुटले अन् NMMT बसने सहा जणांना उडवले

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने सहा जणांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

तुर्भे नाका परिसरात फायझर कंपनी रोड स्ट्रीचजवळ एनएमएमटीच्या इलेक्ट्रीक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अतिवेगात बस चालवत असल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळते. नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने सहा पादचाऱ्यांना धडक दिली. तुर्भे पोलिसांनी चालक प्रमोद कनोजियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त बस देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल