पाकिस्तान युद्धबंदीसाठी भिक मागत होता तर किमान आपल्या कुलभूषण जाधवला तरी सोडवायचे होते, संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना केलेल्या भाषणात पाकिस्तान युद्धबंदीसाठी हिंदुस्थानकडे भिक मागत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पाकिस्तान जर युद्धबंदीसाठी भिक मागत होता तर POK नाही तर किमान कुलभूषण जाधवला तरी मागायचे होते, अशा शब्दात त्यांनी भाजपला फटाकरले.
”सरकार बोलतेय की पाकिस्तान आमच्यासमोर भिक मागत होता, हात जोडून युद्धबंदीसाठी आपल्याला विनंती करत होता. युद्धविराम करून आपल्याला काय मिळालं. युद्धविरामाच्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? चर्चा पाकव्याप्त कश्मीरवर होणार होत होती. पाकव्याप्त कश्मीर तर मिळाले नाही. किमान गेल्या पंधरा वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात तडपत असलेल्या आपल्या कुलभूषण जाधवची तरी सुटका करायची होती, आपले मच्छिमार जे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत त्यांना सोडवायचे होते, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List