सरकारला काळ माफ करणार नाही, कंत्राटदार महासंघाने हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे दिले पुरावे

सरकारला काळ माफ करणार नाही, कंत्राटदार महासंघाने हर्षल पाटील ठेकेदार असल्याचे दिले पुरावे

जलजीवन मिशनची कामे हर्षल पाटील आणि त्यांचे बंधू अक्षय पाटील यांनीच केली होती. तांदूळवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांच्या ठिकाणी लावलेल्या भूमिपूजनाच्या फलकांवर ठेकेदार म्हणून हर्षल आणि अक्षय पाटील या बंधूंचीच नावे आहेत. त्यांनी ती कामेही शंभर टक्के पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने त्या फलकाची छायाचित्रे तसेच जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची यादीच समोर आणली आहे.

सरकारनेच कंत्राटदार हर्षल पाटील यांचा बळी घेतल्याचा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटनेने केला होता. तो अत्यंत खरा असल्याचे संघटनेचे नेते मिलिंद भोसले यांनी म्हटले आहे. एक सुशिक्षित बेरोजगार तरुण अभियंता गेला, पण त्याचे दुःख किंवा खंत सरकार आणि मंत्र्यांना नाही. पण काळ माफ करणार नाही. आता सत्ता आहे म्हणून काहीही दावे प्रतिदावे कराल, पण गेलेला आत्मा या सर्व प्रक्रियेमध्ये जाऊन हा पराकोटीचा निर्णय त्याने घेतला आहे, असा संताप भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता