आळंदीत रंगणार महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद

आळंदीत रंगणार महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद

एमआयटी कर्ल्ड पीस युनिक्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन आणि एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसदतर्फे 19 ते 20 जुलै या कालावधीत ‘महाराष्ट्र कारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आळंदी (देवाची) येथील हनुमानवाडीमधील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल येथे होणाऱया परिषदेत राज्यभरातील 60 कीर्तनकार व 150 सरपंच सहभागी होणार आहेत.

परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, यशोधन महाराज साखरे, एमआयटी युनिक्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशनच्या प्रभारी प्राचार्या डॉ. शलिनी टोणपे, राष्ट्रीय सरपंच संसदेचे सह समन्वयक प्रकाश महाले यावेळी उपस्थित होते. एमआयटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून ही गोलमेज परिषद होत आहे. 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. अन्न क औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, खांडबहाले डॉट कॉमचे निर्माते डॉ. सुनील खांडबहाले, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड यावेळी उपस्थित राहणार आहेत.

20 जुलै रोजी होणाऱया ‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची वाटचाल’ या विषयावर होणाऱया सत्रासाठी माहिती तंत्रज्ञान व सामाजिक कार्यमंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार वैभव डांगे, अभय टिळक उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायाची 21व्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची दिशा, स्वरूप, समस्या व आव्हाने आणि निराकरणाची संभाव्य कृतिशील उपाययोजना हा या परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, जयंत पाटील यांचा हल्ला सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, जयंत पाटील यांचा हल्ला
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’. गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी...
हे करून पहा – मानेवर काळे डाग पडले तर…
महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल
असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…
सिलिंडर स्फोटात तीन मजली घर कोसळले; 15 जण जखमी, वांद्रे पूर्वच्या भारतनगर येथील दुर्दैवी घटना
गाझातील कॅथलिक चर्चवर चुकून हल्ला – नेतन्याहू