छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीकडून अटक, काय आहे प्रकरण? वाचा…

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीकडून अटक, काय आहे प्रकरण? वाचा…

प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीने याप्रकरणी भिलाई येथील बघेल यांच्या निवासस्थानी छापे टाकले.

‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल याला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. छाप्यांदरम्यान चैतन्य यांनी सहकार्य न केल्याचा आरोप आहे, आणि नवीन पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने यापूर्वीच माजी मंत्री कवासी लाखमा, रायपूरचे महापौर आणि काँग्रेस नेते ऐजाज धेबर यांचे भाऊ अन्वर धेबर, माजी आयएएस अधिकारी अनिल तुतेजा आणि इंडियन टेलिकॉम सर्व्हिस (आयटीएस) अधिकारी अरुणपती त्रिपाठी यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.

हा कथित दारू घोटाळा 2019 ते 2022 दरम्यान झाला, जेव्हा छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार सत्तेत होते. या घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीला 2,100 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले, तर दारूच्या सिंडिकेटला अवैध नफा मिळाला, असा आरोप आहे. याप्रकरणी आतापर्यंत 205 कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू Ratnagiri News – महावितरणच्या हलगर्जीपणाचे दोन बळी, विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणांचा मृत्यू
महावितरणच्या पडलेल्या विद्युतभारीत तारांना स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावात घडली. हे...
माध्यमांसमोर बेताल बडबड आली अंगलट, नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहणार; वकिलांची दंडाधिकारी न्यायालयात हमी
कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल
Ratnagiri News – कोकण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, विनायक राऊत यांचा आरोप
Jammu Kashmir – भरधाव ट्रकची कारला धडक, अपघातात अमरनाथला चाललेले 8 भाविक जखमी
Video – विधानभवनातील राड्यावर अंबादास दानवे काय म्हणाले?
सत्तेचे माजकारण! संपूर्ण देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी मालिका राज्यात सुरू – उद्धव ठाकरे