ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील

ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील

स्व. आर.आर.आबांनी जशी डान्स बार बंदी केली तशीच ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, अशी मागणी आज विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केली.

विधानसभेत बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, “ऑनलाईन गेमिंगमुळे युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. आर्थिक हव्यासापोटी व जाहिरातबाजीला बळी पडून युवक ऑनलाईन गेमिंगकडे आकर्षित होत आहे. तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. यात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाची पाऊले उचलली आहेत, त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.”

कैलास पाटील म्हणाले, या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन गेम बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कायदे अस्तित्वात नाहीत. परंतु, ऑनलाइन गेमवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फतच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गतचे नियम राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ऑनलाइन गेमिंगचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केली आहे, त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे सुतोवाच केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू...
केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान