कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल

कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात, गुन्हेगारांवर कारवाई होणार का? विधानसभेत भास्कर जाधव यांचा सवाल

कोकणातील जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला आहे. या वणव्यांमुळे कोकणातील समृद्ध जैवविविधता, पशु-पक्षी आणि पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येवर उपाययोजना म्हणून वणवे लावणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासण्याची मागणी त्यांनी केली. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी आणि गैर-सरकारी संस्था (एनजीओ) यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “कोकणात जंगलांना जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. त्यामुळे तिथले पशु-पक्षी, जैवविविधता नष्ट होत आहे. वणवे लावणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करता येईल का? वणवे लावणे थांबलं तर जैवविविधता वाचेल. याविषयी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंड आणि एनजीओच्या माध्यमातून प्रयत्न करणार का?”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य? केळं खाल्ल्यावर पाणी पिणं योग्य की अयोग्य?
केळं हे एक असं फळ आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मऊसर, गोडसर आणि ऊर्जा देणारं हे फळ नाश्त्यासाठी आदर्श...
महायुतीच्या काळात कर्जात वाढ, जनतेच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकारने काढला पळ; अंबादास दानवेंची टीका
Chhattisgarh News – नारायणपूरमध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार
Mumbai News – बँकॉकहून मुंबईत गांजा तस्करी प्रकरणी मुंबई विमानतळावर प्रवाशाला अटक, सीमाशुल्क विभागाची कारवाई
Photo – सई… बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल
महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करेन; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणावी, युवा पिढीचं भविष्य अंधारात घालायचे पाप करू नका – कैलास पाटील