महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

सरकारवर आधी 9 लाख 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 10 लाख कोटी रुपयांवर कर्ज झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱयांनी मांडून लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

 महायुती सरकार हे जनताविरोधी असल्याचा टीका दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. बोगस बियांचे मोठे प्रकार घडले असताना त्याबाबत कोणताही कायदा आणलेला नाही. या अधिवेशनात बऱयाच मंत्र्यांनी टाईमपास केला आहे. जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधातील हे  सरकार कार्यभार चालवण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही दानवे यांनी केला. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईचे गिरणी कामगार, शिक्षकांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था भ्रष्टाचार, शालार्थ आयडी घोटाळा आदी मुद्दय़ांवर सभागृहात आवाज उठवला. शक्तिपीठ महामार्ग, हिंदी सक्ती, मेघा इंजिनीअरिंगचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, मात्र सरकारने खुलासा केला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय? डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा! किती धोकादायक हा आजार, त्यावर उपचार काय?
जगातील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पण सध्या ते एका आजाराने त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक अहवालाने...
महाड MIDC तील कंपनीला आग, अग्रिशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना
Video – Uddhav Thackeray Interview | Part – 1 | निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या! – उद्धव ठाकरे
भाजपचाच बाप मुंबई तोडणार! संजय राऊत यांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा खास शैलीत समाचार
भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत यांची टीका
जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू